Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथील युवा उद्योजकाची मोठी झेप; 'शेतकरी कृषी परिवर्तन' कंपनीच्या माध्यमातून धान्य प्रक्रिया उद्योगाचा श्रीगणेशा! शेतकऱ्यांच्या मालाला मिळणार आता सोन्याचा भाव; जितेंद्र गुंड यांच्या पुढाकारातून काटीत आधुनिक धान्य स्वच्छता केंद्र सुरू!

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी: उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतशील शेतकरी आणि युवा उद्योजक जितेंद्र नरसिंग गुंड यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने गावातच आधुनिक शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ केला आहे. या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी अडचण दूर झाली असून, त्यांच्या मालाला आता थेट मार्केटमध्ये चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीवर कायमस्वरूपी तोडगा
शेतात गहू, सोयाबीन यांसारखी पिके काढल्यानंतर त्यात माती, खडे आणि कचरा राहिल्यामुळे बाजारपेठेत शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही. मालाची गुणवत्ता कमी असल्याचे सांगून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. शेतकऱ्यांचे होणारे हे नुकसान टाळण्यासाठी जितेंद्र गुंड यांनी PMKSY 2.0 योजनेच्या माध्यमातून 'शेतकरी कृषी परिवर्तन फार्मर प्रोड्युसर कंपनी' स्थापन केली आहे.

एका तासात १५ क्विंटल धान्य होणार स्वच्छ
या कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आधुनिक मशीनची क्षमता तासाला १५ क्विंटल इतकी आहे. यामध्ये गहू आणि सोयाबीनसह सर्व प्रकारची कडधान्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून दिली जातात. विशेष म्हणजे, स्वच्छ केलेले धान्य ही कंपनी थेट शेतकऱ्यांकडून चांगल्या दराने खरेदीही करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाचणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक
या उद्योगाचे संचालन चेअरमन जितेंद्र गुंड आणि डायरेक्टर आबासाहेब रोडे करत आहेत. या नव्या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी अनिल हंगारकर, 'एकमत'चे पत्रकार प्रा. अभिमान हंगरगेकर, मशीन ऑपरेटर पंकज भापकर, तौफिक शेख, महेश हाके, धनंजय गुरव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जितेंद्र गुंड यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून, शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी अपडेटसाठी पाहत राहा: Only न्युज धाराशिव

Post a Comment

0 Comments