Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. अश्विनी पांढरे यांचा सुनील राऊत यांच्याशी साध्या पद्धतीने शुभविवाह संपन्न; तुळजापूरच्या लेकीचा आदर्श विवाह; अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
आपल्या शैक्षणिक कर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या आणि नेदरलँड्स येथील लायडन विद्यापीठात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. अश्विनी रामचंद्र पांढरे यांचा विवाह मेकॅनिकल इंजिनिअर सुनील बाळकृष्ण राऊत यांच्याशी नुकताच अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. नळदुर्ग रोडवरील ब्रह्मचैतन्य मंगल कार्यालयात झालेल्या या विवाह सोहळ्याने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

डॉ. अश्विनी पांढरे यांनी ग्रामीण विकास व समाजकार्य विषयात डॉक्टरेट मिळवली असून, सप्टेंबर महिन्यात ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) येथे होणाऱ्या 'सोशल डेमोक्रॅटिक चेंज' या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांची निवड झाली आहे. शहरातील प्रसिद्ध बॅटरी व्यावसायिक रामचंद्र पांढरे यांची त्या कन्या आहेत. त्यांचे पती सुनील राऊत हे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

काही दिवसांपूर्वीच डॉ. अश्विनी यांच्या शैक्षणिक यशाबद्दल शहरात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवल्यानंतरही, लग्नासारख्या प्रसंगी कोणताही बडेजाव न करता, अतिशय साधेपणाने हा विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय पांढरे व राऊत परिवाराने घेतला. रविवार, १० मे २०२६ रोजी हा शुभविवाह पार पडला.

या विवाह प्रसंगी श्री. बापूसाहेब अमृतराव, श्री. तुकाराम (आप्पा) मुळे, बाबा घोंघते,श्री. नवले सर, श्री. राजाभाऊ कदम, श्री. राजू धरणे, श्री. शंकर जाधव, श्री. नाडे साहेब यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देत त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments