Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

स्वातंत्र्य दिनीच मराठवाडयाचे प्रवेशव्दार असलेल्या शेळगांव व वाणेवाडी मधील विद्यार्थी रस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी तिरंगा घेऊन उतरले रस्त्यावर.... रस्त्याच्या मागणीचा 25 वर्षांपासूनचा संघर्ष . ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट.

सोलापूर:-बार्शी तालुक्यातील शेळगाव हे  मराठवाडा हद्दी लगतचे सिमावर्तीय भागातील गांव आहे.या गावातून मराठवाड्यातील तुळजापूर,काटी, सावंतवाडी व वाणेवाडी आदी महत्त्वाच्या गावाला जाणारा रस्ता आहे.हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या विभागाला  जोडला जाणारा  अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता शेळगाव या गावाच्या पूर्व दक्षिण कोपर्यातून पुढे मराठवाडयाला मिळतो. शिवाय सोलापूर - बार्शी या महामार्गाला देखील तो रस्ता मिळतो .त्यामुळे या रस्त्याने शेतकरी,विद्यार्थी, व्यापारी आदींचे माध्यमातून मोठी दळणवळण सुरू असते.हा रस्ता गेली 25 ते 30 वर्षा पासून वाहतुकीस योग्य नाही.रस्त्यावर पुल नसल्याने रस्ता अतिवृष्टीचे काळात पाण्याखाली जातो,रस्त्याचे कडेला काटेरी झाडा झुडपानी वेढा घातला आहे त्यामुळे रस्ता दिसत नाही. चिखल होत असल्यामुळे दुचाकी, चारचाकी वहाने, बैलगाडी आदी वहाने जात येत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाणेवाडी लगतच्या  परंतु शेळगाव हद्दीतील बसवेश्वर नगर भाग 1 व 2 मधील रहिवासी,शेतकरी, शेतमजूर,दुध उत्पादक, शाळकरी मुले, व्यापारी यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. 

सध्या शेळगाव पाझर तलाव संततधार पावसामुळे तुडुंब भरला असून त्याचा  सांडवा दुतर्फा वहात आहे. यामुळे स्थानिक रहिवास्याचे प्रचंड हालहाल सुरू आहेत.शेतीची कसलीही कामे करता येत नाहीत त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. शाळकरी मुलांना या अडचणीच्या रस्त्यामुळे  शाळेला सक्तीने सुट्टी घ्यावी लागत आहे.दिवसेंदिवस नागरीकामध्ये असंतोष व संताप वाढत आहे.हा रस्ता दुरूस्त होऊन मिळावा म्हणून शेळगाव,वाणेवाडी मधील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच,तंटा मुक्त समिती अध्यक्ष,तसेच जिल्हा परिषद शाळेचे  मुख्यादयापक, शिवाय स्थानिक शेतकरी दयानंद बादगुडे, बळीराम बादगुडे, उत्तम अडसूळ, योगेश काटकर,केरबा बादगुडे,प्रविण बादगुडे व जितेंद्र मिरजे  वगैरै लोकांनी प्रशासनाला अनेक लेखी निवेदने दिली आहेत. लोकशाही दिनात देखील मागणी केली होती.शिवाय मुंबई येथे मंत्रालयाच्या लोकशाही दीनात देखील याबाबत निवेदन दिले आहे.

यासाठी धाराशिव चे खा.ओम राजे निंबाळकर, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा सूरू आहे.
परंतु प्रशासन मात्र सुस्त आहे. सिमावर्तीय भागातील रस्ता असलेने अधीकार क्षेत्राच्या कारणा वरून प्रशासन‌ या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
त्यामुळे याचा उद्रेक स्थानिक रहिवासी, शेतकरी व विद्यार्थी वर्गात वाढत आहे.  

शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी 79 व्या स्वातंत्र्यदिनी लहान बालक विद्यार्थ्यानी हातात तिरंगा घेऊन  सदर  रस्त्यावर उतरून आपला संताप त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शेतकऱ्यांनी देखील पुन्हा या अनोख्या आंदोलनातून रस्ता दुरुस्तीची मागणी लावून धरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज धाराशिव 
मुख्य संपादक 
उमाजी गायकवाड 
9923005236

Post a Comment

0 Comments