Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव शहरातील प्रसिद्ध उद्योजक तथा काटीचे सुपुत्र माजी पंचायत समिती सदस्य संजय देशमुख यांचे निधन; मंगळवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

काटी:-धाराशिव शहरातील  प्रसिद्ध व नामांकित उद्योजक सनग्रुपचे सर्वेसर्वा तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील तळमळीचे कार्यकर्ते माजी पंचायत समिती सदस्य संजय बाजीराव देशमुख वय (52) वर्षे यांचे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले.

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सन ग्रुप व काटी गावावर दुखाचा डोंगर पसरला आहे. संजय देशमुख हे मूळचे तुळजापूर तालुक्यातील काटी येथील असले तरी देशमुख बंधूंनी 1992 पासून  सनग्रुपच्या माध्यमातून आपल्या उद्योग व्यवसायास सुरुवात केल्यानंतर त्यांचे वास्तव्य उद्योग  व्यवसायानिमित्त 32 वर्षांपासून धाराशिव शहरातच वास्तव्यास  होते. तसेच त्यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातही मोठा वावर होता. संजय देशमुख  हे सामाजिक कार्यात अग्रेसर असे व्यक्तिमत्व होते. ते संजू भैय्या म्हणून परिचित होते.

धाराशिव व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर तुळजापूर तालुक्यातील काटी येथील देशमुख बंधूंनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सनग्रुपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटत धाराशिव जिल्ह्यात एक वेगळी निर्माण करीत मराठी माणूस देखील चांगला उद्योगजक बनू शकतो हे सिद्ध करुन दाखवले होते. 

त्यांच्या अकस्मात जाण्यामुळे उद्योजक अमरसिंह देशमुख, विजयसिंह देशमुख व शेतकरी असलेले अजय देशमुख यांच्या कुटुंबीयांवर व काटी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.

उद्योजक संजय देशमुख याच्या निधनाचे वृत्त समजताच काटीसह परिसरातील व धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी काटी गावाकडे गर्दी केली होती.

त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दि.17 रोजी हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्या  गावाजवळील शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगी, तीन भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments