सुधीर पंचगल्ले/मुरुम
१ } आळंदी 🔸:------------
|| पालखी आळंदीतून निघते आळंदी म्हणजे
|| 'आत्मानंद' पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो.
२ ) पुणे 🔹:------------
|| पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की
|| जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन 'पुण्य' प्राप्त होते.
|| { भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा
|| मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम
|| असतो. }
३ } दिवेघाट 🔸:------------
|| नंतर पालखी 'संवत्सर ग्राम उर्फ सासवड' या क्षेत्राकडे
|| निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम,
|| नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व
|| समाधी या अष्टांगयोगाच्या आचार 'दिव्यातून' जावे लागते.
४ } सासवड 🔹:------------
|| वड म्हणजे 'सप्तचक्र' मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर,
|| अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची
|| जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती
|| प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण,
|| श्वासावर ताबा म्हणजे 'सासवडचा' मुक्काम व परमार्थाचा
|| मार्ग सोपान होऊन 'सोपानदेवांच्या' समाधीचे दर्शन घ्यावे.
५ } जेजुरी 🔸:------------
|| नंतर पालखी जेजुरीला येते. 'ज = जितेंद्र, जोरी = जास्त
|| त्रास न घेणे' म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना
|| जिंकतो तो आनंदी होतो.
६ } वाल्ह्या 🔹:------------
|| भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो.
|| भर तारुण्यात माणसाने 'वाल्हे = कोमल, प्रेमळ,
|| जिव्हाळासंपन्न' झाले पाहिजे. { 'वाल्ह्यात वाल्मिकी
|| ऋषींच्या समाधीचे दर्शन होते' }
७ } लोणंद 🔸:------------
|| त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते.
|| 'लो = देणे, आनंद = परमसुख' श्रीविठ्ठल भक्तीसाठी
|| घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी
|| होतो व तो आनंद इतरांना देतो.
८ } तरडगाव 🔹:------------
|| जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला
|| जीवनात रडावे लागेल या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी
|| पालखी 'तर + रड = तरडगावला' येते.
९ } फलटण 🔸:------------
|| ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या | म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे.
|| बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ
|| आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो.
|| हे जीवनाचे सत्य समजल्यावर
१० } बरड 🔹:------------
|| संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो.
|| त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे 'बरड'
|| जमिनीसारखे होते.
११ } नातेपुते 🔸:------------
|| नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन
|| तो फक्त 'श्रीविठ्ठलाचा' होतो.
१२) माळशिरस 🔹:------------
|| माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस
|| पायी चालल्याने 'शारीरिक' मुखाने नामस्मरण केल्याने
|| 'वाचिक' विठ्ठलध्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन -
|| प्रवचनाच्या 'श्रवणाने' ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप
|| करते.
१३ } वेळापूर 🔸:------------
|| त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा
|| वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान
|| होते.
१४ } वाखरी 🔹:------------
|| वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी
|| 'प्रासादिक व वाचासिद्ध' होऊन.
१५ } नंतर तो पंढरपूर जाऊन 'पांडुरंगमय' होतो.
🙏 पांडुरंग...... पांडुरंग...... माऊली विठ्ठल 🙏
संकलन
प्रा.डाँ.सुधीर पंचगल्ले
श्री. माधवराव पाटील महाविद्यालय,मुरुम ता.उमरगा
|| मंगळवार :--- { १७ / ०६ / २०२५ } !....
0 Comments