Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

|| पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते. || त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत

सुधीर पंचगल्ले/मुरुम 
१ } आळंदी 🔸:------------ 

|| पालखी आळंदीतून निघते आळंदी म्हणजे 
|| 'आत्मानंद' पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. 

२ ) पुणे 🔹:------------ 

|| पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की 
|| जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन 'पुण्य' प्राप्त होते. 
|| { भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा 
|| मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम 
|| असतो. }

३ } दिवेघाट 🔸:------------ 

|| नंतर पालखी 'संवत्सर ग्राम उर्फ सासवड' या क्षेत्राकडे 
|| निघते. सासवडला जाताना दिवेघाटातून म्हणजे यम, 
|| नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व 
|| समाधी या अष्टांगयोगाच्या आचार 'दिव्यातून' जावे लागते. 

४ } सासवड 🔹:------------ 

|| वड म्हणजे 'सप्तचक्र' मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, 
|| अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र या सप्तचक्रांची 
|| जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती 
|| प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, 
|| श्वासावर ताबा म्हणजे 'सासवडचा' मुक्काम व परमार्थाचा 
|| मार्ग सोपान होऊन 'सोपानदेवांच्या' समाधीचे दर्शन घ्यावे.

५ } जेजुरी 🔸:------------ 

|| नंतर पालखी जेजुरीला येते. 'ज = जितेंद्र, जोरी = जास्त 
|| त्रास न घेणे' म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना 
|| जिंकतो तो आनंदी होतो. 

६ } वाल्ह्या 🔹:------------ 

|| भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. 
|| भर तारुण्यात माणसाने 'वाल्हे = कोमल, प्रेमळ, 
|| जिव्हाळासंपन्न' झाले पाहिजे. { 'वाल्ह्यात वाल्मिकी 
|| ऋषींच्या समाधीचे दर्शन होते' }

७ } लोणंद 🔸:------------ 

|| त्यानंतर पालखी  लोणंदला मुक्कामाला येते. 
|| 'लो = देणे, आनंद = परमसुख' श्रीविठ्ठल भक्तीसाठी 
|| घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी 
|| होतो व तो आनंद इतरांना देतो. 

८ } तरडगाव 🔹:------------ 

|| जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला 
|| जीवनात रडावे लागेल या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी 
|| पालखी 'तर + रड = तरडगावला' येते. 

९ } फलटण 🔸:------------ 

|| ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या | म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे. 
|| बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ 
|| आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. 
|| हे जीवनाचे सत्य समजल्यावर

१० } बरड 🔹:------------ 

|| संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. 
|| त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे 'बरड' 
|| जमिनीसारखे होते. 

११ } नातेपुते 🔸:------------ 

|| नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन 
|| तो फक्त 'श्रीविठ्ठलाचा' होतो. 

१२) माळशिरस 🔹:------------ 

|| माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस 
|| पायी चालल्याने 'शारीरिक' मुखाने नामस्मरण केल्याने 
|| 'वाचिक' विठ्ठलध्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन - 
|| प्रवचनाच्या 'श्रवणाने' ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप 
|| करते. 

१३ } वेळापूर 🔸:------------ 

|| त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. क्षणभर सुद्धा 
|| वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान 
|| होते. 

१४ } वाखरी 🔹:------------ 

|| वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी 
|| 'प्रासादिक व वाचासिद्ध' होऊन.

१५ } नंतर तो पंढरपूर जाऊन 'पांडुरंगमय' होतो.

  🙏 पांडुरंग...... पांडुरंग...... माऊली विठ्ठल 🙏
            
          संकलन
प्रा.डाँ.सुधीर पंचगल्ले
श्री. माधवराव पाटील महाविद्यालय,मुरुम ता.उमरगा
|| मंगळवार :--- { १७ / ०६ / २०२५ } !....

Post a Comment

0 Comments